किरकोळ वादातून ग्रामस्थांच्या हल्ल्या तरुणाचा मृत्यू

1710 views

रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत ग्रामस्थांवर दगडफेक करणाऱ्या युवकाचा ग्रामस्थांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.5) रात्री 9:30 वा. घडली. भाग्यश्री अनिल कांबळे (वय 19 रा. खराडी बायपास, खांदवेनगर, पुणे ) यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. गु.र.नं.270/2024 भा.द.वि.कलम- 302, 326, 324, 504, 506, 34, 143, 147, 148, 149, सह शस्त्र अधिनिअम कलम 4 (25). अन्वये वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 year ago
Date : Thu Jun 06 2024

image

वडगाव मावळ दि.6 (प्रतिनिधी) कामा फार्म कुसुर खांडी रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत ग्रामस्थांवर दगडफेक करणाऱ्या युवकाचा ग्रामस्थांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.5) रात्री 9:30 वा. घडली.


भाग्यश्री अनिल कांबळे (वय 19 रा. खराडी बायपास, खांदवेनगर, पुणे ) यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

 गु.र.नं.270/2024 भा.द.वि.कलम- 302, 326, 324, 504, 506, 34, 143, 147, 148, 149, सह शस्त्र अधिनिअम कलम 4 (25). अन्वये वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





अक्षय बाबाजी जगताप (वय 26, रा. चंदननगर, पुणे) हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

 अशोक तुरडे, मोहन तुरडे, सुभाष तुरडे व 05 ते 07 अनोळखी इसम (सर्व रा. कुसूर ता मावळ जि पुणे) यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार 

मयत अक्षय जगताप याने आरोपीचा भाऊ अंकुश तुरडे याला बुधवारी (दि. 5) रात्री 8.30 वा. कुसुर ते खांडी रोड लगत भांडण केले, मयत अक्षय जगताप याने अंकुश तुरडे यास नाकावर बुक्की मारून त्याला जखमी केल्याच्या कारणावरुन आरोपी अशोक तुरडे, मोहन तुरडे, सुभाष तुरडे इतर 05 ते 07 अनोळखी लोकांनी लोखंडी कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडके व लोखंडी सळ्याच्याने अक्षय जगताप यांच्या डोक्यात व पाठीवर हातापायावर वार करून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारले आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड करीत आहेत. आरोपी अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना केले आहे, लवकरच आरोपींना अटक करणार असल्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले.




लेटेस्ट अपडेट्स

165 views
Image

*PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत*

मुंबई दि.11 (प्रतिनिधी) PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी अखेर १५ दिवसांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली असून, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेरआढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने शेळके यांच्या प्रयत्नांना अखेर यश लाभले आहे.


Read More ..