नवले, भेगडे, दाभाडे यांच्यासह आमदार शेळके यांच्या उमेदवारीने चर्चा

833 views

वडगाव मावळ दि.9 (प्रतिनिधी) संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 226 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा ऊर्फ नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्यासह बहुतांश विद्यमान संचालक तसेच मावळचे आमदार सुनील शेळके यांचे भाऊ , ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश असल्याने निवडणुकीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असून चर्चेला मोठे उधाण आले आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 4 months ago
Date : Sun Mar 09 2025

image


पाच गटांमध्ये सर्वांधिक 47 अर्ज हे सोमाटणे-पवनानगर या गटातील तीन जागांसाठी दाखल झाले असून इतर मागासवर्ग एका जागेसाठी तब्बल 37अर्ज आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली.


5 एप्रिल रोजी होणाऱ्या कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी (दि.7) शेवटचा दिवस होता. संचालक मंडळाच्या एकूण 21 जागांसाठी एकूण 226 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे 


यामध्ये ऊस उत्पादक गट क्रमांक 1 हिंजवडी-ताथवडे या गटातील 3 जागांसाठी 23 अर्ज, ऊस उत्पादक गट क्रमांक 2 पौड-पिरंगुट या गटातील 3 जागांसाठी 18 अर्ज, ऊस उत्पादक गट क्रमांक 3 तळेगाव-वडगाव या गटातील 3 जागांसाठी 29 अर्ज, ऊस उत्पादक गट क्रमांक 4 सोमाटणे पवनानगर या गटातील तीन जागांसाठी 41 अर्ज, ऊस उत्पादक गट क्रमांक 5 खेड-शिरूर-हवेली या गटातील चार जागांसाठी 37 अर्ज, महिला राखीव दोन जागांसाठी 23 अर्ज, अनुसूचित जाती/जमाती एका जागेसाठी 9 अर्ज, इतर मागासवर्ग एका जागेसाठी 37 अर्ज व विमुक्त जाती/भटक्या जमाती/विमाग्र एका जागेसाठी 9 अर्ज असे एकूण 226 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी सोमवारी (दि.10) तारखेला होणार असून, अर्ज मागे घेण्यासाठी 25 मार्चपर्यंत मुदत आहे. दि 5 एप्रिल रोजी आवश्यकतेनुसार मतदानप्रक्रिया घेण्यात येणार आहे.


दरम्यान, 226 उमेदवारीअर्ज दाखल झाले असले तरी काही उमेदवारांनी दोन-दोन अर्ज भरले असल्याने प्रत्यक्षात उमेदवारांची संख्या सुमारे 200 च्या आसपास आहे. 25 मार्च रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार आहे.




लेटेस्ट अपडेट्स

145 views
Image

*PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत*

मुंबई दि.11 (प्रतिनिधी) PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी अखेर १५ दिवसांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली असून, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेरआढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने शेळके यांच्या प्रयत्नांना अखेर यश लाभले आहे.


Read More ..